info

कळमनुरी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत; पंपाचा स्टार्टर बिघडला

कळमनुरी, दि. ०२ सप्टेंबर २०२६ – कळमनुरी शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कडपदेव पंपहाऊस येथील ९० एचपी क्षमतेच्या पंपाचा स्टार्टर खराब झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे नागरिकांना पुढील २ ते ३ दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर स्टार्टरची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे २ ते ३ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम…

Read Full News

हिंगोली शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांवर नियंत्रण मिळवा; जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

हिंगोली (सहारा न्यूज प्रतिनिधी): हिंगोली शहरातील विविध चौकांमध्ये दिवसेंदिवस बिकट होत चाललेली वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यावर तातडीने उपाययोजना आखण्यात याव्यात, या मागणीसाठी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले. शहर परिसरात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांना रोज मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने…

Read Full News

*शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या 82 व्या जयंती दिनानिमित्त हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन..*

आज दिं.20 ऑगस्ट रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भारताच्या विकासाला आधुनिक व सर्वसमावेशक दिशा देणारे, पंचायत राज व्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे जनक, भारताचे सर्वात तरुण माजी पंतप्रधान भारतरत्न “स्व.राजीवजी गांधी” यांना 82 व्या जयंती दिनानिमित्त स्व.राजिवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंगोली…

Read Full News

ग्रामसेवकांची हजेरी आता ‘जीपीएस’ आणि ‘बायोमेट्रिक’द्वारेच! राज्य शासनाचे सर्व जिल्हा परिषदांना कडक निर्देश

​मुंबई (saharanews.in): ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची हजेरी केवळ ‘बायोमेट्रिक प्रणाली’ आणि ‘जीपीएस’ (GPS) लोकेशन आधारित मोबाईल ॲपद्वारेच नोंदवली जाणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ​गैरहजेरीला बसणार आळा…

Read Full News

खर्गे यांच्या अपमानाचा हिंगोलीत तीव्र निषेध: काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने भाजप आणि RSS विरुद्ध धडक मोर्चा

हिंगोली (विशेष प्रतिनिधी, सहारा न्यूज): अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुनजी खर्गे यांच्या हल्द्वानी (उत्तराखंड) येथील सभेनंतर भाजप, RSS व मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी त्या जागेचे गंगाजल शिंपडून ‘शुद्धीकरण’ केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी आज, १४ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने भाजप आणि RSS…

Read Full News

व्हॉइस ऑफ मीडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर विजय चोरडिया प्रदेशाध्यक्ष; अजितदादा कुंकलोळ व नरेंद्र देशमुख विभागीय प्रदेशाध्यक्ष

मुंबई | प्रतिनिधी व्हॉईस ऑफ मीडिया,व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व नवोदित पदाधिकाऱ्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग आणि जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया यांची नियुक्ती…

Read Full News

‘डायल ११२’ आपत्कालीन सेवेत हिंगोली पोलीस दलाची गरुडझेप; जुलै महिन्यात महाराष्ट्रात पटकावला प्रथम क्रमांक!

हिंगोली (विशेष प्रतिनिधी): आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळवून देणाऱ्या ‘डायल ११२’ (Dial 112) या सेवेमध्ये हिंगोली पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जुलै महिन्यात तब्बल १०२९ नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत तातडीने मदत पुरवत हिंगोली पोलिसांनी राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार/मानांकन आपल्या नावे केले आहे. ⏱️ वेळेचे नियोजन आणि प्रतिसादाचा वेग…

Read Full News

शिक्षणात आरोग्याला प्राधान्य! राज्यातील प्रत्येक शाळेची वर्षातून दोनदा होणार अन्न तपासणी; तुकाराम मुंडे यांचे कडक आदेश

सहारा न्यूज / विशेष प्रतिनिधी कळमनुरी राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अन्न विषबाधेसारख्या घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. आता राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांमधील अन्नाची वर्षातून किमान दोनदा कसून तपासणी (Food Audit) केली जाणार आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी यासंदर्भात अत्यंत…

Read Full News

हिंगोली जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’; नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा!

* कमी उंचीच्या पुलांवरून धोकादायक प्रवास टाळण्याचे आवाहन. * सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण. हिंगोली | सहारा न्यूज नेटवर्क (Saharanews.in): प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या ताज्या हवामान सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तीव्र शक्यता वर्तविण्यात…

Read Full News

शाळांच्या परिसरात वडापाव-बर्गरवर रेड सिग्नल! डब्यातूनही जंक फूड गायब; मध्यान्ह भोजनासाठी नवी नियमावली जाहीर

मुंबई | Saharanews.in शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी शिक्षण व आरोग्य विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. आता शाळांच्या परिसरात वडापाव, बर्गर, नूडल्स, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या घरच्या डब्यातूनही (टिफिन) जंक फूड हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात…

Read Full News